जोगिणींवर हल्ला झाल्याचा आरोप चुकीचा- रेल्वे मंत्री पीयूष गोयल
![Allegation of attack on Jogini is false: Railway Minister Piyush Goyal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Piyush-Goyal.jpg)
उत्तर प्रदेश |
उत्तर प्रदेशात अलीकडे जोगिणींवर रेल्वे प्रवासाच्या दरम्यान हल्ला झाल्याचा आरोप खोटा आहे, असे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी धादांत खोटे व चुकीचे वक्तव्य केले असून जोगिणींवर रेल्वे प्रवासाच्या दरम्यान हल्ला झालेला नाही असे गोयल यांनी सांगितले. जोगिणींवर हल्ल्याची कथित घटना झाशी रेल्वे स्थानकावर १९ मार्च रोजी झाली होती. त्याचे पडसाद केरळच्या विधानसभा निवडणुकात उमटले असून गेल्या आठवड्यात हे प्रकरण मुख्यमंत्री विजयन यांनी गृह मंत्री अमित शहा यांच्याकडे उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
गोयल यांनी सांगितले, की स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर जोगिणींच्या विरोधात पोलिसांकडे चौकशीसाठी तक्रार करण्यात आली होती. त्यात काही आरोप होते. काही लोकांनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांनी शहानिशा केली. पोलिसांनी सर्व कागदपत्रे तपासली. सदर जोगिणी या खरोखर प्रवासी होत्या की नव्हत्या, त्यांचे उद्देश काय होते याची चौकशी करून पोलिसांनी त्यांना सोडून दिले. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, संघ परिवाराच्या विद्यार्थी कार्यकत्र्यांनी जोगिणींना मारहाण करून रेल्वेतून ढकलून देण्याचा प्रयत्न केला असे आरोप करण्यात आले असून ते खोटे आहेत.
वाचा- शिवसेनेचे मंत्री अडचणीत येणार? किरीट सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार