पहाटेचा शपथविधीवर अजित पवार स्पष्टच बोलले
उपमुख्यमंत्री असताना माझ्यापुढे फडणवीसांना अडकवण्याची चर्चा कधीही झाली नाही
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी एक राजकीय खेळी असू शकते, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र आता पहाटेच्या शपथविधीवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मी आजवर अनेकदा या शपथविधीवर बोलणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे यावर कदापीही बोलणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी विषयाला बगल दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी काळामध्ये त्यांना अडकवण्याचा कट होता, असं विधान केलं आहे. यावर देखील अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. कोण काय बोलतो त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही मोकळे नाही. टीका करणाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडली तर लोकांना जास्त कळेल. अडीचवर्षे उपमुख्यमंत्री असताना माझ्यापुढे देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याची चर्चा कधीही झालेली नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.