“अर्थसंकल्पात महाराष्ट्राला वेगवेगळ्या खात्यांचा निधी मिळाला पाहिजे”; अजित पवार
![Ajit Pawar said that Maharashtra should get funds from different departments in the budget](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/ajit-pawar-4-780x470.jpg)
कारखाने बाहेर गेले ते परत येण्याकरिता कोणताही प्रयत्न होत नाही
मुंबई : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. 1 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्याची केंद्र सरकारवर टिका केली आहे.
आताचा अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून आहे. या अर्थसंकल्पात गॅस सिलेंडरचा दर वाढला आहे, प्रचंड महागाई वाढली आहे, यापासून केंद्र सरकारने देशातील जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामध्ये रेल्वेचा निधी मिळायला हवा. वेगवेगळ्या खात्यांचा निधी असतो तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, ही महाराष्ट्राचा नागरिक म्हणून अपेक्षा आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले.
हे सरकार गोरगरीबांचे नाही, ‘सर्वसामान्यांचे… सर्वसामान्यांचे सरकार’ आहे असा टोला अजित पवार यांनी लगावतानाच भाजप आमदार नरेंद्र पाटील यांच्याकडून सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. मी कामासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागतो त्यावेळी कॉल केल्यानंतर ‘दादा देऊ काही काळजी करू नका’ लवकरच देऊ..दोघेही पॉझिटिव्ह बोलतात निगेटिव्ह अजिबात बोलत नाही. कुठलं काम आहे, काय आहे विचारतात, मात्र वेळ काही मिळत नाही. आम्हाला नुसतं खेळवतायत की फक्त चालढकल करत आहेत की वेळ मारुन नेतायत हे कळायला मार्ग नाही. आमचं ‘सर्वसामान्यांचे सरकार’ बोलतात, मात्र कुठेही महागाई कमी करण्याचे, कारखाने बाहेर गेले ते परत येण्याकरिता प्रयत्न होत नाहीत. उलट बाहेरचे मुख्यमंत्री येतात आणि इथल्या उद्योगपतींना, बॉलिवूड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांना तुम्ही आमच्याकडे चला बोलत आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत १५ दिवस अगोदर बैठक मुख्यमंत्री यांनी घ्यायची असते. कुठले प्रश्न महाराष्ट्राचे असावेत याबाबत पुस्तिका काढली जाते. परंतु ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मुद्दामहून कुणी टाळले नाही. डॉ. अमोल कोल्हे मुंबईत होते म्हणून ते बैठकीला गेले, बाकीचे खासदार दिल्लीत होते, असेही अजित म्हणाले.