जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात अजित पवार गटही आक्रमक, आव्हाडांना थेट इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Untitled-design-780x470.jpg)
मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहरी होता असं वक्तव्य केलं. त्यानंतर आता भाजपा आक्रमक झाली आहे, तर अजित पवार गटानेही जितेंद्र आव्हाडांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासांत गुन्हा दाखल केला नाही तर वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या बाहेर महाआरती केली जाईल, असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे.
आनंद परांजपे म्हणले,जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्राविषयी अभद्र वक्तव्य केलं आहे. प्रभू श्रीराम मांसाहार करत होते. १४ वर्षे राम वनवासात असताना त्यांनी मांसाहार केला आणि त्यांचाच आदर्श ठेवून आम्हीही मांसाहार करतो असं त्यांनी म्हटलं, आनंद परांजपे पुढे म्हणाले मला माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. जे प्रभू रामाची महाआरती करायला गेले होते. त्यांनी आंदोलन केलं नाही .जितेंद्र आव्हाड कायमच हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात. आता पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला नाही तर वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर महाआरती करणार आहोत,असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे.
हेही वाचा – ‘राम मांसाहारी होता’ जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर भाजप नेते भडकले!
जितेंद्र आव्हाड म्हणाले, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात उपस्थित केला.
शिबिरानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.