‘जरांगेंना अक्कल नाही, लोकांची फसवणूक करतो’; अजय महाराज बारसकरांचे सनसनाटी आरोप
![Ajay Maharaj Baraskar said that Jarangs have no common sense and cheat people](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Ajay-Maharaj-Baraskar-780x470.jpg)
मुंबई | मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील लढाईमधील महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगेंनी संत तुकाराम महाराजांचा आपमान केला असा आरोप त्यांनी केला आहे. अजय महाराज बारसकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत.
अजय महाराज बारसकर म्हणाले की, मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशांसाठी काम करत नाही. मी कीर्तन करतो. त्याचे पैसे घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात खडखद होती. ती मी व्यक्त केली आहे. त्यानंतर मला अनेक फोन येत आहेत. गोळ्या घालून मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. परंतु माझे काम सत्य सांगणे आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही.
हेही वाचा – ‘२४ फेब्रुवारीपासून गावागावात रास्ता रोको, २९ पासून उपोषण’; मनोज जरांगेंची घोषणा
१० फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी समाजाची बैठक घेतली नाही? त्यावेळी लोकांनी विरोध केला. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. परंतु एक फोन आल्यानंतर जरांगे यांनी भूमिका बदलली. समाज अंतरवालीत गेला नाही. लोक आले नाहीत, त्यामुळे जरांगे संतापले होते. लोक जमा करता येत नाही, मी उपोषण कसे करु, असे जरांगे बोलल्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, असं अजय महाराज बारसकर म्हणाले.
मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे. त्याचा मिटिंग रात्री होतात. वाशीला आंदोलल पोहचलो. त्या रात्री पुन्हा गुप्त मिटिंग केल्या.
अधिसूचनेत म्हटलं हे लागू सोळा तारखेला होईल. पण त्याची इच्छा होती, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं येऊन मला पाणी पाजावं. जरांगेला फक्त श्रेय हवं. जेसीबीतून फुलं हवीत कार्यक्रम हवेत. आरक्षण गरिबाला हवंच आहे. पण याचं काय? याला तर फक्त श्रेय हवं आहे, असं ते म्हणाले.
२३ डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजन गाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी येथे ही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता, असंही अजय महाराज बारसकर म्हणाले.