breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कल्याणमधील ‘ती’ १४ गावं नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून राहणार वंचित?

कल्याण: कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांचा समावेश हा नवी मुंबई महापालिका केला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली असली, तरी अद्याप ही गावे महापालिकेत समाविष्ट झालेली नाहीत. इतर महापालिकांबरोबर नवीमुंबई महापालिकेने आरक्षणाच्या सोडत जाहीर केली. मात्र, ही सोडत १४ गाव विरहितच होती. त्यामुळे ही गावे नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून वंचित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील आणि सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. दरम्यान, बांगर यांनी सांगितले की, १४ गावं समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजून अध्यादेश निघाला नसल्यामुळे त्या गावांचा सध्याच्या निवडणूक प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आलेला नाही. १४ गावातील नागरिकांची मागणी आहे की, ही गावे लवकरात लकवर समाविष्ट करा.

  • येत्या काळात गावे नवीमुबंई महापालिकेत येतील अशी लक्षणं – राजू पाटील

राजू पाटील यांनी सांगितले की, इकडून प्रस्ताव कोकण आयुक्तांकडे गेलेला आहे. पुढे युडीला जाऊन प्रोसेस चालू आहे. एकंदरीत सर्व सकारात्मक चाललेलं आहे. आमचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री स्वतःहून लक्ष देतात असे आयुक्त साहेबांनी सांगितलं. आता निवडणूक जरी लागल्या असतील, तरी तिथे सध्या निवडणूक होणार नाहीत. येत्या काळात ती गावे नवीमुबंई महापालिकेत येतील अशी लक्षणं दिसतायत.

  • १४ गावं समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू – आयुक्त अभिजित बांगर

“१४ गावं समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजून अध्यादेश निघाला नसल्यामुळे त्या गावांचा सध्याच्या निवडणुकीचा ज्या प्रभाग रचनेत समाविष्ट करण्यात आलेला नाही. जेव्हा तो अध्यादेश निघेल तेव्हा तत्कालीन परिस्थिती नुसार निवडणूक आयोग जो निर्णय देईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल”, असं नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

  • याबाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“१४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश केला, त्याचा निर्णय देखील अधिवेशनात घेतला. परंतू आता निवडणूक प्रक्रिया ही जी काही थांबली होती ती न्यायालयाच्या डायरेक्शनने सुरू करण्याचा आदेश झाला आहे. तांत्रिक बाब लक्षात घेऊन यावर निर्णय घेतला जाईल. या लोकांना ज्या मुलभूत सोयी सुविधा पाहिजे ते देण्याचे काम नक्की केले जाईल”, असं राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागंतिलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button