जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
ठाणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडत, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी अटक केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी आव्हाडांना ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी याप्रकरणी सुनावण्यात झाली.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडत, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडत, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी अटक केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी आव्हाडांना ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी याप्रकरणी सुनावण्यात झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने 1 तास निकाल राखून ठेवला होता. तासाभराने न्यायालयाने निकाल दिला असून, जितेंद्र आव्हाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आव्हाडांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ठाणे न्यायालयाच्या या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. आव्हाडांच्या जामीन अर्जावर दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आव्हाडांना जामीन मिळणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या जामीनावर न्यायालयात सुनावणी झाली. जितेंद्र आव्हाडांच्या वतीने अॅड. प्रशांत कदम यांनी त्यांच्या अटकेवर युक्तिवाद केला. तसेच, आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचा युक्तिवाद अॅड कदम यांनी केला आहे. दाखल करण्यात आलेले गुन्हे जाणीवपूर्वक करण्यात आले असून, कलम 7 हा वाढवू शकत नाही. कारण तशी तरतूद 1932 साली करण्यात आली आहे, जी महाराष्ट्रात लागू होत नसल्याचे त्यांनी म्हंटले.
या प्रकरणी आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. आव्हाडांवर कलम 141,143,146, 149, 323, 504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.