फडणविसांनी केला महिलांचा अवमान, तत्काळ माफी मागा – आदित्य ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/aditya-thackeray.jpg)
मुंबई | महाईन्यूज
शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावरच्या भाषणात केलं होतं. त्यावरून शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे.
माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात शोभत नाही. देवेंद्रजी, सहसा मी टीकेला प्रत्युत्तर देत नाही. मात्र, तुम्ही भाषणात शिवसेनेने बांगड्या भरल्या असतील आम्ही नाही, अशी टीका केली होती. बांगड्या हे काही कमकुवतपणाचं लक्षण नाही. त्याला कमी लेखू नका. महिला या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. राजकारण हे होत राहील. मात्र, टीकेचा आणि चर्चेचा स्तर आपण राखला पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारचं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यानी केली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-56-1.png)
आम्हाला शेतक-याच्या विश्वासघाताची चिंता – फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका या सरकारनं पहिल्या दिवसापासून सुरू केली. आम्ही लढून पुन्हा सत्तेत येऊ. आम्हाला आमच्या विश्वासघाताची चिंता नाहीये, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची आहे. तुम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं याचा हिशेब जनतेला दिला पाहिजे.