परीक्षा नाहीच, शाळा आताच चालु होणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/tulcr9k8_uddhav-thackerey-_625x300_19_May_20.jpg)
मुंबई : “अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत याबाबत राज्यपालांनीही मला कळवलेले आहे. शाळाही आता सुरु होणार नाहीयेत. अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा होऊ शकते. मुंबईच्या रस्त्यावर वडापाव लवकरच मिळेल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितले आहे. सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यातील कोरोना स्थिती आणि विरोधकांवर आपले मत मांडलेले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, “अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत याबाबत राज्यपालांनीही मला कळवले आहे. शाळाही आता सुरु होणार नाहीयेत. अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा होऊ शकतेय. शाळा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु होणार असे विचारा. मी निर्णय घेताना टीकेची पर्वा करत नाही, बरोबर वाटेल ते करतोच, परीक्षा व्हावी असे मलाही वाटते, पण परिस्थिती तशी नाहीये. तिस-या वर्षांच्या मुलांना सरासरी मार्क देऊन अडथळे दूर केले आहेत. सरासरी मार्क नको असलेल्यांना परीक्षेचाही पर्याय उपलब्ध केलेला आहे.”
“मुंबईच्या रस्त्यांवर देखील वडापाव लवकरच मिळेल. WHO ने धारावीचं उदाहरण साऱ्या जगाला दिले आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही मुंबईत लपवाछपवी नाही असं म्हंटलेलं आहे. विरोधक काय म्हणतायत त्याकडे लक्ष देत नाही. देवच म्हणतोय मी तुमच्यातच आहे, मंदिरात येऊ नका. लॉकडाऊन आहेच, एकेक गोष्टी सोडवत आहे”, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.