breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनासमोर प्रस्ताव- वर्षा गायकवाड
मुंबई: राज्य शासनाने 23 नोव्हेंबरपासून नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या वर्गांमध्ये पुन्हा वर्ग सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनासमोर ठेवलेला आहे. याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्चऐवजी मे महिन्यात घेण्यात याव्यात असाही आमचा प्रस्ताव असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे.