breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

तब्बल 10 हजार ड्रेस, 4 किलो सोनं, 610 किलो चांदी, 11 टीव्ही, 10 फ्रीज, जयललितांची मालमत्ता सरकारच्या ताब्यात

चेन्नई: तमिळनाडू सरकारने राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत पक्षप्रमुख जे. जयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ या निवासस्थानातून 4 किलो सोनं, 610 किलो चांदी, 8 हजार 376 पुस्तकं, 38 एअर कंडीशनर आणि 10 हजार 438 ड्रेस ताब्यात घेतले गेले आहेत. तमिळनाडू सरकार जयललिता यांचं स्मारक तयार करणार आहे. जयललिता यांचे तमिळनाडू आणि देशभरात लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी तमिळनाडू सरकार जयललिता यांच्या स्मारकात काही वस्तू प्रदर्शनासाठी ठेवणार आहे. त्यामुळेच सरकारने जयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ या निवासस्थानातून काही महत्त्वपूर्ण वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. सरकार त्या सर्व वस्तू जयललिता यांच्या स्मारकात प्रदर्शनासाठी ठेवणार आहे.

तमिळनाडू सरकार जयललिता यांचं ‘वेदा निलयम’ या तीनमजली घराचं रुपांतर स्मारकात करणार आहे. जयललिता यांच्या दिवंगत आईने हे घर विकत घेतलं होतं. या स्मारकात प्रदर्शनदेखील असणार आहे. जयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ या निवासस्थानातील बऱ्याच वस्तू प्रदर्शनात ठेवल्या जाणार आहेत. तमिळनाडू सरकारने जयललिता यांच्या घरातून सोनं, चांदी, पुस्तकं आणि कपड्यांव्यतिरिक्त अनेक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 11 टीव्ही, 10 रेफ्रिजरेटर, 29 मोबाईल आणि टेलिफोन, 394 स्मृतीचिन्ह, 65 सूटकेस, 108 कॉस्मेटिक वस्तू, सहा घड्याळ यांचा समावेश देखील आहे. त्याचबरोबर दोन आंब्याची झाडे, पाच नारळाची आणि केळीच्या झाडांचादेखील यात समावेश आहेत. तमिळनाडू सरकारच्या या अधिग्रहणाला जयललिता यांच्या कायदेशीर वंशजांनी विरोध केला आहे. जयललिता यांचा पुतना दीपक आणि पुतनी दीपा यांनी राज्य सरकारचा विरोध केला आहे. मात्र, तरीही तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी जयललिता यांच्या निवासस्थानाचं रुपांतर स्मारकात व्हावं यासाठी निवासस्थान सरकारच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. राज्यपालांच्या अध्यादेशानंतर मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांच्या नेतृत्वात जयललिता मेमोरियल फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली आहे. या फाउंडेशनचे उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वमसह इतर मंत्री सदस्य आहेत. तमिळनाडू सरकारने ‘वेदा निलयम’ मिळवण्यासाठी 25 जुलै रोजी सिव्हिल कोर्टात 67.9 कोटी रुपये जमा केलेले आहेत. यापैकी 36.9 कोटी रुपये आयटी आणि कराच्या थकबाकीसाठी दिले जातील. तर उर्वरित रक्कम जयललितांच्या कायदेशीर वंशजांना दिले जाऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button