ठाकरे सरकारचं पहिलचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी…
ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज म्हणजे सोमवारी सुरुवात होणार आहे. शेतकरी कर्जमाफी, महिलांची सुरक्षितता आदी मुद्द्यांवरुन हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत भाजप नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहेत.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच अधिवेशनही आणि त्यातही अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने त्यांच्या कामगिरीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.दि. ६ मार्चला २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अधिवेशनात पाच प्रस्तावित शासकीय विधेयके मांडून विचारात घेण्याचे प्रस्तावित आहे. त्याचबरोबर पाच अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्याचे प्रस्तावित आहे…
दरम्यान विधिमंडळाचे कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांचा परिचय सभागृहाला करुन दिला. त्यानंतर विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. सरकारने दिलेले वचन न पाळल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.. भाजप आमदारांच्या हातात सरकारच्या धोरणाविरोधातील फलक आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, कालिदास कोळंबकर, अतुल सावे आदींसह पक्षाच्या आमदारांनी आक्रमक धोरण स्वीकारले आहे….
विधानभवनाच्या पायऱ्यावरुन विरोधकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळाली पाहिजे अशी मागणी करत ठाकरे सरकारच्या धिक्काराच्या घोषणा दिल्या जात आहेत…