breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
ज्यांनी महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा बंद केल्या, ते दिल्लीत प्रचार करायला येत आहेत !
नवी दिल्ली | ज्यांनी महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा बंद केल्या, तेच आज दिल्लीत प्रचारासाठी येत आहेत अशा शब्दांत केजरीवालांनी विनोद तावडे यांना शालजोडे मारले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यामध्ये ते भाजपचा प्रचार करण्यासाठी सभा घेत आहेत.
त्यांनाच चिमटा घेताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्याच शैलीत सुनावले. केजरीवाल यांनी बुधवारी केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.