breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
अर्णब गोस्वामी अटकेनंतर सरकार वर ‘आणीबाणी’ परिस्थितीवरून टीका करणार्यांना आमदार रोहित पवारांचं सणसणीत प्रत्युत्तर
![It is inappropriate to use an organization like ED in a political manner - Rohit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/rohit-pawar-1.jpg)
अहमदनगर: पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ठाकरे सरकार वर भाजपा कडून टीका करण्यात आलेली आहे. तसेच ‘आणीबाणी’ परिस्थितीवरून टीका करणार्यांना रोहित पवारांंनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलेलं आहे.
रोहित पवार म्हणाले की, सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करताना,द वायर, NDTV, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवत नाही. पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवतं.