शिवसेना-भाजप युतीबाबत चंद्रकांत पाटील यांचे मोठे विधान
शिवसेना-भाजपने एकत्र यावे ही सर्वसामान्य मानसाची इच्छा
पिंपरी चिंचवड | शिवसेनेतील अस्वस्थता हळूहळू बाहेर पढायला लागली आहे. काही खासगीत तर काही ओपन बोलू लागलेत. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त ख-या शिवसैनिकाला उद्धवजी, शिवसेना दाबून ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांना हिंदुत्वाकडे जावेच लागेल असे सांगत शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता आहे का असे विचारताच ‘राजकारणात शक्यता एका क्षणामध्ये निर्माण’ होते असे मोठे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीबाबत केले. दोन भावांनी भांडणे संपवून पुन्हा एकत्र यावे ही सर्वसामान्य मानसाची इच्छा असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमीपूजन पाटील यांच्या हस्ते आज (बुधवारी) झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप शिवसेना युतीचा पूल केवळ नितीन गडकरीच बांधू शकतात असे वक्तव्य शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, की एक बरे झाले आहे की शिवसेनेतील अस्वस्थता हळूहळू बाहेर पढायला लागली आहे. कुठे तानाजी सावंत बोलले, कुठे रामदास कदम बोलले असे सुरु झाले आहे. काही खासगीत बोलतात, काही ओपन बोलतात. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त ख-या शिवसैनिकाला उद्धवजी, शिवसेना दाबून ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांना हिंदुत्वाकडे जावेच लागेल. त्यामुळे असा एखादा ओपनली बोलतो.
शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता आहे का? असे विचारले असता पाटील म्हणाले, माहित नाही. कारण, राजकारणात शक्यता एका क्षणामध्ये निर्माण होते. 2014 ला युती झाली नव्हती. नंतर भाजप-शिवसेनेचे सरकार झाले. रोज वाटायचे पडेल. कारण, राजीनामे खिशात होते ना, त्यावर लिहिले काही नव्हते. पण ते नुसतेच काढून दाखवायचे, तरीही पाच वर्षे सरकार चालले. त्यामुळे राजकारणामध्ये असे काही निश्चित सांगता येत नाही.
पण, सर्वसामान्य मानसाची ही इच्छा आहे, की चला दोन भावांची भांडणे झाली. केव्हा तरी त्यांनी भांडण संपून पुन्हा एखदा जुने संबंध निर्माण करायला लागतात. पण, असे आम्ही म्हटंल रे म्हटंल की सामनामध्ये अग्रलेख येतो. यांना सत्ता नसल्यामुळे झोप लागत नाही. खुप शांत झोप लागते. हलवून उठवावे लागते, असेही पाटील म्हणाले.