चिखलीकडून मोई गावाकडे जाणारा इंद्रायणी नदीवरील पुल वाहतुकीसाठी बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-47-2-780x470.jpg)
पिंपरी : चिखली येथून मोई गावाकडे जाणारा इंद्रायणी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.
मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. लोणावळा धरण भरत आले आहे. त्या धरणातून इंद्रायणी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होणार आहे. दरम्यान नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आहे. मावळ परिसरातील बहुतांश पाणी इंद्रायणी नदीत येते.
हेही वाचा – १०० कोटींची वसूली ते ठाकरेंना अडकवण्याचा प्लॅन; श्याम मानव यांचा मोठा दावा
इंद्रायणी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत. त्या पुलांवरून वाहतूक करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे. चिखली येथून मोई गावाकडे जाणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलावर पाणी आले आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.