breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये कच-यांचे ठेकेदार बसले भाजप पदाधिका-यांच्या मानगुटीवर

  • निविदेत दंडात्मक कारवाईची तरतूद नसल्याने सत्ताधा-यांना जूमानतच नाहीत
  • अख्खे शहर अजूनही कच-यातच, आरोग्य अधिका-यांस कामाचा बसेना ताळमेळ

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजप पदाधिका-यांना मागील अडीच वर्षात शहरातील कच-यांचा प्रश्न सोडविता आला नाही. घरोघरचा कचरा संकलन करणे आणि कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे आठ वर्षासाठी शहराची विभागणी केली. मात्र. मागील दहा दिवसापासून अख्खे शहर कच-यात असतानाही भाजप पदाधिका-यांना ठेकेदारांवर नोटीस देण्यापलीकडे कारवाई करता आलेली नाही. निविदा प्रक्रियेत ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईची तरतूद न ठेवल्याने कच-यांचे दोन्ही ठेकेदारा भाजप पदाधिका-यांच्या मानगुटीवर बसले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक कच-यांच्या समस्येने पुरते हैराण झाले असून जागोजागी कच-याचे ढिग साचले आहे. 

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघराचा कचरा उचलणे, कचरा संकलन करुन मोशीत घेवून जाण्याचे आठ वर्षांचे टेंडर काढले होते. शहराची उत्तर आणि दक्षिण भागात विभागणी करुन देण्यात आली. उत्तर भाग बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड तर, दक्षिण भाग ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना काम देण्यात आले. 1 जुलैपासून ठेकेदारांनी प्रत्यक्षात कचरा संकलन व वहनाच्या कामास सुरुवात केले.

पिंपरी चिंचवड शहरात दोन्ही ठेकेदारांच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. आठही प्रभागात कच-यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. ठेकेदार घरोघरचा कचरा व्यवस्थित संकलित करीत नाहीत. वाहनांची उंची अधिक असल्याने कचरा टाकताना महिलांना अडचणी येत आहेत. तसेच  सोसाट्यांमधील कचरा उचलला जात नाही. कचराकुंडीच्या बाहेर पडलेला कचरा उचलला जात नाही. केवळ कुंडीतीलच कचरा उचलला जात आहे. जागोजागी कच-याचे ढिग साचले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवून संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, महापालिकेच्या अधिका-यांनी दोन्ही ठेकेदारांशी हिताचा करारनामा करीत अटी-शर्ती टाकल्या आहेत. ठेकेदारावर कारवाई करण्यास अडचणी येत आहेत. किमान सहा महिने दंडात्मक कारवाई करता येत नसल्याने नोटीस देण्यापलिकडे काहीच करु शकत नाहीत. आतापर्यंत दोन वेळा नोटीस दिली आहे.

ठेकेदारांना दिली केवळ नोटीस

शहरात कच-याची समस्या गंभीर बनली आहे. ठेकेदारांकडे कचरा संकलनास छोट्या गाड्या 53 असून त्यांना 38 गाड्यांची आवश्यकता आहे. रस्त्याच्या कडेचा आणि कचरा कुंडीबाहेरील कचरा उचलून गाडीत टाकणे आवश्यक आहे.  उत्तर भागातील कचरा संकलन आणि वहनाबाबत किरकोळ तक्रारी येत आहेत. कंत्राटदार बी.व्ही.जी इंडिया यांच्याकडे कचरा संकलन आणि वहनासाठी 110 छोट्या गाड्या आहेत. त्यामुळे जास्त तक्रारी नाहीत”. अशी माहिती प्रभारी आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button