breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पन्नास हजार तरूणांना रोजगार उपलब्ध करणार – पार्थ पवार 

कळंबोली, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार स़ंघ हा नैसर्गिक सामग्रीने नटलेला परिसर आहे. आगामी काळात मावळला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  याठिकाणी उद्योगाला चालणा देण्यासाठी जागतीक शिखर परिषद भरविण्यात येणार आहे. त्यामुळे गुंतवणूक वाढवून ५० हजार तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे,  असे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचार दौरा सुरू आहे.  कळंबोली येथे पवार यांनी कामगारांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. पार्थ पवार म्हणाले की, उरण,  पनवेल,  कर्जत हा परिसर फिल्म सिटीज विकसित करण्यासाठी अनुकूल आहे.  हा भाग या क्षेत्रात विकसित झाल्यानंतर जगाच्या नकाशावर नोंद होईल. शिवाय मावळात मोकळी जमिन मोठ्या प्रमाणात आहे.  याठिकाणी मोठमोठ्या कंपन्या आणल्या जातील. त्यासाठी जागतीक शिखर परिषद घेऊन विदेशी कंपन्यांना या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी पाचारण केले जाणार आहे. त्यामुळे मावळ मतदार संघातील हजारो तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे,  असेही पार्थ पवार म्हणाले.
कळंबोली येथील मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समितीला भेट दिली. तेथील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक,मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समिती सभापती गुलाबराव जगताप, आमदार बाळाराम पाटील,पनवेल महानगरपालिकेचे विरोध पक्षनेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, सातारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, आजी माजी पदाधिकारी व माथाडी कामगार उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button