पंढरीचा वारकरी सेवा़भावी वृत्तीचा : चैतन्यमहाराज देगलूरकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/chaitanya-maharaj-degulkar97_201807103101.jpg)
पिंपरी – अनेक मराठी-कानडी लोकांचे कुलदैवत हे विठोबा आहे. पंढरीचा विठोबा हा तसा सर्वांचाच आहे. असे असले तरी त्यावर वारकऱ्यांचा जास्तीत जास्त अधिकार आहे, असे मत प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय वारकरी महामंडळ आणि पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी, प्रमोदमहाराज जगताप, चंद्रकांत महाराज वांजळे, पुरूषोत्तम महाराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवीतकर, प्रकाश महाराज जवंजाळ, उमेशमहाराज देशमुख, सतीशमहाराज काळजे, संतदास महाराज मनसुख, संयोजक शेखर कुटे, नाट्य परिषद अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक नाना काटे, निर्मला कुटे, रंगनाथ फुगे, बाबासाहेब तापकीर, रामभाऊ बराटे आदी उपस्थित होते.
देगलूकर महाराज म्हणाले, समितीवर काम करणे अवघड किंवा अशक्य नाही. त्यासाठी समितीवर काम करण्याची आवड असणाºया व्यक्तीस संधी दिल्यास चांगले काम होईल. विठोबा केवळ वारकऱ्यांचा असा अभिनिवेश बाळगणे चुकीचे आहे. महाराष्ट्रातील असे अनेक लोक आहेत. की त्यांचे कुलदैवत विठोबा आहे. मराठी आणि कानडी असे अनेक लोक आहेत, ते विठोबाला मानतात. त्यामुळे विठोबा हा सर्वांचाच देव आहे. कारण त्याकडे सर्वांचाच ओढा आहे. त्यामुळे पंढरपूर अधिक स्वच्छ चांगले कसे राहिल यासाठी काम करण्याची गरज आहे. पंढरीत काय सेवा असाव्यात नसाव्यात यावर चर्चा होणे गरजेचे आहे. पंढरीचा वारकरी हा सेवाभावी वृत्ती जोपासणारा आहे. त्यामुळे देवस्थान किंवा समितीनेही वारकरी हीत पाहण्याची गरज आहे.