breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दूषित पाण्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांचे आरोग्य धोक्यात, पिंपरी युवा सेनेची मंत्रालयात ‘धडक’

  • पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना दिले निवेदन
  • प्रदुषणामुळे कंपन्यांना सूचना देण्याची केली मागणी

पिंपरी, (महाईन्यूज) – कचरा आणि अपुरा पाणी पुरवठा या दोन समस्यांनी पिंपरी-चिंचवडकरांना नाकी नऊ आणले आहे. तक्रारी करून सुध्दा पालिका प्रशासन निर्ढावल्यासारखे वागू लागले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सर्व कारखान्यांना सूचित करुन घनकचरा व दूषित पाण्याचे शुध्दीकरण करण्याची यंत्रणा सुरु करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी युवा सेनेच्यावतीने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना केली आहे.

  • पिंपरी -चिंचवड व पुणे परिसरामध्ये नागरिकांना वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागत असून प्रदुषणामुळे व हवामान बदलामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वन्यजीव वन्यप्राणी व वनस्पती यांना देखील वाढत्या प्रदूषणाचा धोका तयार झाला आहे. उद्योग व कारखाने याद्वारे घनकचरा, प्रदूषित पाणी व तयार झालेल्या दूषित पाण्याचे शुध्दीकरण करुन त्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. कारखाने व उद्योग हे आर्थिक बचत करण्यासाठी कुठल्याही शुध्दीकरण प्रक्रियेशिवाय हे दुषित पाणी थेट नदी- नाल्यात सोडून देतात. त्यामुळे जीवसृष्टी व पर्यावरणाची हानी होत आहे. हे प्रदुषण रोखण्यासाठी युवा सेनेच्या वतीने आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री रामदास कदम यांना निवेदन देण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील सर्व कंपन्यांना दुषित पाणी प्रक्रिया करून सोडण्याच्या सूचना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

तसेच, नागरिकांना त्वचा विकार, श्वसनाचे आजार तसेच कर्करोग यांचे प्रमाण वाढले आहे. युवासेना पुणे जिल्हा समन्वयक रुपेश कदम, युवती सेना अध्यक्षा प्रतिक्षा घुले, पिंपरी विधानसभा विभागसंघटक निलेश हाके, उपविभाग संघटक सनी कड, रवी नगरकर, अजित बोराडे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button