breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन विरोधक राज्य सरकार यांच्यात कलगीतुरा

मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज पासून सुरु झाले असून ,राज्याचा अर्थसंकल्प येत्या ८ मार्च रोजी मांडण्यात येणार आहे.मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन येण्या अगोदर राज्यातील वातावरण तापले असून आज अधिवेशनाचा कामकाजाला सुरुवात झाली त्यानंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन विरोधक आणि राज्य सरकार यांच्यात चांगलाच कलगी तुरा रांगल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जसं मराठवाडा, विदर्भ विकास झाला पाहिजे तशी इतर भागांचाही विकास झाला पाहिजे. कोकण आणि उत्तर महाराष्ट्र विकास मंडळ झालं पाहिजे. त्याचा ठराव दिल्लीला पाठवला आहे, त्याचा विचार झाला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याच्या विचारत आहे.त्या बाबत राजकारण करण्याचा विचार करू नका. याबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा केली आहे. मंडळ आहेत असं गृहीत धरून निधी वाटप झालं पाहिजे. यासाठी अधिकचा निधी देऊ, असं ते म्हणाले. अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीची १२ नाव जाहीर होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ जाहीर होतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button