breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेच मुख्य संशयित- महाराष्ट्र एटीएस

मुंबई – मनसुख हिरेन हत्या प्रकरण एनआयएकडे सोपवले गेले असले, तरी एकीकडॆ महाराष्ट्र एटीएसकडून या प्रकरणाचा वेगाने तपास केला जात आहे. त्यामुळेच या केसमध्ये नित्य नवे खुलासे एटीएसकडून करण्यात येत असून, आज एटीएसचे अप्पर पोलीस महासंचाक जयजीत सिंग यांनी, अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हेच मुख्य संशयित आरोपी असल्याचा दावा केला आहे.

आज मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसकडून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन आतापर्यंतच्या तपासाबद्दल खुलासा करण्यात आला, त्यात जयजित सिंग यांनी हा दावा केला गेला आहे. तसंच, निलंबित कॉन्सटेबल विनायक शिंदेचा मनसुख हिरेनच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग आहे, असंही सिंग यांनी स्पष्ट केले.

वाचा :-26 मार्चच्या शेतकरी संघटनांच्या भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा

दरम्यान, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत आढळून आल्यानंतर, त्यांची पत्नी विमला हिरेन यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, पुढील तपास करण्यात आला होता. यामध्ये सचिन वाझे यांच्यावर खुनाचा आरोप करण्यात आला आहे. पण सचिन वाझे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. स्कॉर्पिओ गाडी आणि मनसुख हिरेन यांच्याशी कोणतेही संबंध नसल्याचा दावा सचिन वाझेंनी केला आहे. पण त्यांच्या विरोधात पुरावे आमच्या हाती लागले आहे, असं जयजीत सिंग यांनी सांगितलं.

तसेच, या गुन्ह्यांत वापरण्यात आलेले सिम कार्ड जप्त केले गेले आहेत. काही सिम कार्ड हे गुजरात येथून जप्त केले आहेत. बनावट नावावर सिम कार्ड घेतले गेले आहेत. या प्रकरणी बुकी नरेश गोरला अटक केली आहे. या हत्येत विनायक शिंदेचा देखील सहभाग आहे. विनायक शिंदे यानेच मनसुख यांना बोलावले होते, असंही सिंग यांनी सांगितलं.

मोबाईल फोन आणि सिमकार्ड नष्ट केले गेले आहेत आणि जी व्होल्वो कार जप्त केली आहे. ती गाडी मनसुख यांच्या हत्येकरता वापरली होती का, याची अजून चौकशी केली जात आहे. सचिन वाझे यांचा ताबा मिळावा याकरता ट्रान्सफर ॲार्डर मिळाली आहे. पण, NIA कोर्टात वाझे यांचा ताबा घेण्यासाठी ATS जाणार आहे, असंही सिंग यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button