TOP Newsताज्या घडामोडीमुंबई
‘भारत जोडो’तून राज्यात राजकीय लाभ व्हावा!
![Political benefit should be gained from 'Bharat Jodo' in the state!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/rahul-gandhi-12-780x470.jpg)
मुंबई : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात यशस्वी करण्यावर सर्व नेत्यांनी भर दिला असून ही पदयात्रा इतिहास निर्माण करेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांच्या रविवारी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या यात्रेच्या माध्यमातून राज्यात पक्षाचा राजकीय फायदा व्हावा अशी अपेक्षा नेतेमंडळींनी व्यक्त केली. राज्यातील पदयात्रेला ७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याच्या तयारीसाठी टिळक भवन मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राजस्थानचे नेते सचिन पायलट, राज्याचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण, विधिमंडळ नेते आणि यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात आदी या वेळी उपस्थित होते.