Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

विमान कंपन्यांचे उत्तरदायित्व निश्चित करावे; खासदार सुप्रीय सुळे यांनी केली मागणी

मुंबई : विमान प्रवास करताना विमानांना उशीर होण्याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. त्यानंतर यासंदर्भात कोणतीही पावले उचलली जात नाही. विमान प्रवास करताना विमानांना उशीर झाल्यास संबंधित विमान कंपनी काहीच दखल घेत नाही. आता सर्वसामान्यांच्या भावनांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हात घातला आहे. एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना त्यांनाही विमानास उशीर होण्याचा अनुभव आला. त्यामुळे त्या संतप्त झाला. त्यांनी या प्रकरणी सोशल मीडियावर ट्विट करत विमान कंपन्यांचे उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर लिहिले, मी एअर इंडियाची फ्लाइट एआय0508 ने प्रवास करत आहे. या विमानास 1 तास 19 मिनिटे उशीर झाला आहे. विमानास उशीर होणे ही सवयच बनली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असतो. हे अस्वीकार्य आहे. केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे. त्यांना आग्रह आहे की एअर इंडियासारख्या विमानांना वारंवार होणाऱ्या उशिराबद्दल उत्तरदायित्व निश्चित करावे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात यावी.

हेही वाचा –  धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जमिनी देण्यास विरोध करणारे सागर देवरे ठाकरे गटात

सुप्रिया सुळे यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. त्यात लिहिले आहे की, एअर इंडियाच्या विमानांना सतत उशीर होत आहे. हे अस्वीकार्य आहे. आम्ही प्रवाशासाठी प्रीमियम शुल्क देऊन तिकीट घेतो. त्यानंतरही विमानांचे उड्डान वेळेवर होत नाही. व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, मुलांना या सर्व कुप्रबंधनाचा फटका बसतो. यामुळे नागरिक उड्डाण मंत्रालयाने कारवाई करावी, तसेच एअर इंडियाचे उत्तरदायित्व निश्चित करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button