हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला, फडणवीसांचा आरोप
![# Covid-19: Maharashtra government fails to handle Corona situation- Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/devendra.jpg)
मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यावेळी गंभीर आरोप केले. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले. मनसुख हिरेन यांच्या हत्या करून मृतदेह खाडीत फेकण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 22,38,398 वर
फडणवीस म्हणाले की, मनसुख हिरेन यांची गावडेंच्या परिसरात गाडीत हत्या केल्यानंतर खाडीमध्ये मृतदेह फेकण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे. हाय टाईडमध्ये बॉडी फेकली गेली असती तर ती परत कधीच आली नसती. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि कायद्याच्या सुदैवाने लो टाईड होता आणि तो मृतदेह परत आला त्यामुळे हे उघडकीस आलं आहे
संपूर्ण परिस्थिती पाहता माझ्या पतीचा खून झाला असावा अशी खात्री आहे. सदरचा खून सचिन वझे यांनी केला असावा असा माझा संशय आहे, त्यामुळे सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई कऱण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केली असल्याची माहिती फडणवीसांनी दिली. सोबतच, सचिन वाझेंना अद्याप अटक का केली नाही ? असा सवाल देखील त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांची तक्रार देखील वाचून दाखवली. हा राजकारणचा विषय नाही पण थेट पुरावे असतानाही वाझेंना अटक होत नसेल तर कोण आणि कशासाठी वाचवत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे, असेही फडणवीस म्हणाले.