सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला भूकंपाचे धक्के, नाशिकही हादरलं
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/20_07_2019-earthquake99l_194162091581264059237.jpg)
मुंबई – मुंबई शहराला गेल्या दोन दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. काल सकाळी उत्तर मुंबईत भुकंपाचे धक्के जाणवल्यानंतर आज पुन्हा पहाटे सहाच्या दरम्यान हादरा जाणवला. तसेच, नाशिकमध्येही तीव्र स्वरुपाचा भुकंपाचे धक्के जाणवले आहेत.
उत्तर मुंबईमध्ये शनिवारी सकाळी 6.36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले. 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यात येणाऱ्या भूकंपानंतर आता मुंबईतही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. दुसरीकडे भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं आहे.
नाशिक जिल्ह्यात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के बसले. 4 रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. शुक्रवारी मध्यरात्री 11.41 च्या सुमारास भूकंप झाला. यात कोणत्याही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अजून समोर आली नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने भूकंपाची माहिती दिली.
याआधी मागच्या महिन्यात पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पालघरमध्ये झालेल्या या सौम्य भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. पालघर जिल्ह्यात 2.8 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.