breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामुंबई

मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधितून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई |  औरगाबादजवळ मालगाडीखाली चिरडून मृत झालेल्या १६ मजुरांच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, या मृत कुटुंबियांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायत्ता निधितून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे. तसेच, जे मजूर या अपघातात जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

परराज्यातील मजूरांची आपापल्या गावी जाण्याची सोय करण्यात आळी आहेच. मात्र, आणखी जास्त रेल्वे सोडण्यात याव्या यासाठी केंद्राशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ही घटना कळताच तातडीने मुख्यमंत्र्यांनी सचिव तसचे रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकांऱ्यांशी चर्चा केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button