‘मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं’- जयंत पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/bbecimg_31512_jayant_patil_final_240x180.jpg)
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थिल्लरपणा करू नये असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यांच्या या सल्ल्यानंतर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले. त्यावर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते
जयंत पाटील यांनी म्हटलं आहे की, “देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्र्याविषयी त्यांनी अशा पद्धतीचं विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला हे फडणवीसांनी स्पष्ट करावं. प्रत्येक वेळी संकटाचा सामना करताना मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणा दाखवला. असे शब्द वापरणे चुकीचं आहे,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी झटकू नका यावर आपलं काय म्हणणं आहे असं उद्धव ठाकरेंना विचारलं असता फडणवीसांनी दिल्लीत जावं म्हणजे मोदीही घराबाहेर पडतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी थिल्लरबाजी करु नये असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं.