मराठा समाजाची दिशाभूल करू नका!
- मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
- आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
मुंबई – मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्यापही मागे न घेतल्याने मराठा समाजामध्ये असंतोष आहे. मराठा समाजाची दिशाभूल करू नये. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत असे मागणी करणारे निवेदन मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आज मुख्यमंत्री कार्यालय व गृहविभागाला देण्यात आले.
मराठा आरक्षणाचा निर्णय नोव्हेंबर अखेरपर्यंत घेण्यात येईल असे आश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आंदोलने स्थगित झाली. मात्र आंदोलकांवरील गुन्हे अद्यापही मागे न घेतल्याने समाजामध्ये असंतोष आहे. परळी मध्ये 18 जुलै ते 7 ऑगस्ट पर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान राज्यात उद्रेक निर्माण झाला होता.
चाकण, पुणे, औरंगाबादसह राज्यातल्या अनेक भागात जवळ जवळ दहा हजार कार्यकत्र्यांवर त्यावेळी गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत असे आंदोलनाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अश्वासनाला महिना होत आला तरी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाही. या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करत असल्याचे डोंगरे यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा आंदोकत्र्यांचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकाएकी गुन्हे मागे घेता येत नाहीत. गंभीर गुन्हे सोडून अन्य गुन्हे मागे घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.