breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४१ वर
मुंबई – भिवंडीमध्ये रविवारी रात्री तीन मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत अजून १४ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. रविवारी (20 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.