‘बेस्ट’ संपाबाबत चर्चेतून मार्ग काढूया: उद्धव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/ह्.jpg)
‘बेस्ट’ संपाबाबत चर्चेतूनच मार्ग काढूया, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले. या संपात मला राजकारण करायचे नाही. मात्र, अवाजवी मागण्या केल्या तर आणखी समस्या निर्माण होतील, असे ठाकरे म्हणाले.
संपावर असलेल्या एकाही ‘बेस्ट’ कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या संपातून मार्ग निघणे गरजेचे असून आम्ही सर्वाशी चर्चा केली, मात्र मार्ग निघू शकला नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली.
बेस्टची आर्थिक स्थिती खराब आहे. ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचे आश्वासन मी दिले होते. ते नक्कीच पूर्ण करू असे सांगत एकत्रित बसून चर्चा केली तरच मार्ग निघेल असेही ते म्हणाले. बेस्टची तिजोरी रिकामी आहे. या संपात मला राजकारण करायचे नाही. मात्र अवाजवी मागण्या केल्या तर अजून समस्या निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
‘खासगीकरण पर्याय नाही’