breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबई – मुंबईत काल सकाळी १० ते २ ते दरम्यान विद्युत प्रवाह अचानक खंडीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही झाला आहे. नागरिकांनी पाणी जपून आणि काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

काल मुंबईतील वीज खंडित झाल्यामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला आहे. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला. आता वीज पुरवठा पूर्ववत झाला असल्याने आज दुपारपासून सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असेही पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button