breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

“जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत सेवा सुरु करणार नाही”; परिवहन कर्मचाऱ्यांचा पवित्रा

मिरा-भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा पालिकेने सुचवलेल्या बसमार्गांवर शुक्रवारपासून सुरू होणार होती, मात्र कंत्राटदाराने लॉकडाऊनच्या कालावधीत अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचा मागील पाच महिन्यांपासून पगार दिलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत वेतन मिळत नाही तोपर्यंत सेवा सुरु करणार नाही असा पवित्राच कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मागील तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी बस आगाराबाहेर ठिय्या आंदोलन केलंय. पगार दिल्यानंतरच परिवहन सेवा सुरू करू, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून मिरा-भाईंदर महापालिकेची परिवहन सेवा बंद आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने पालिकेने कंत्राटदाराला परिवहन सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते, परंतु कंत्राटदाराने लॉकडाऊनच्या कालावधीत कर्मचाऱ्यांचा पगार दिलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी हा पगार देण्याची मागणी लावून धरली.

मागील आठवड्यात महापालिकेकडून कंत्राटदाराला १५ दिवसांत परिवहन सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर कंत्राटदाराचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कंत्राटदाराला उर्वरित रक्कम देण्याचे महापालिकेकडून आश्वासन देण्यात आल्यानंतर शुक्रवारपासून परिवहन सेवा सुरू करत असल्याची माहिती देण्यात आली.

पाच महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात न आल्यामुळे कर्मचाऱ्यांना शुक्रवारी परिवहन सेवा सुरू होत असल्याची माहिती मिळताच मिरा रोड येथील आगाराबाहेर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. तीन दिवसांपासून दिवस-रात्र हे कर्मचारी ठिय्या आंदोलन करत आहेत. कंत्राटदार थकित पगार देत नाहीत, तोपर्यंत परिवहन सेवा सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे महापालिकेची परिवहन सेवा नेमकी कधी सुरू होणार, याबाबत अजून कोणतेही चित्र स्पष्ट नसल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button