breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

चंद्रपूर बलात्कार प्रकरण : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर सडकून टीका… काय म्हणाल्या वाचा!

मुंबई । प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्हात एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. त्या मुलीने आत्महत्या केली. यावर कोणतीही कारवाई न करता सरकार मूग गिळून गप्प आहे. या सरकारचे डोळे कधी उघडणार? असा सवाल भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

वाघ यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण सरकाला शरमेनं मान झुकवणारं आहे. हे वास्तव आहे. सरकारचे डोळे कधी उघडणार? दिशा कायद्याची अंमलबजावणी का केली जात आहे. महिला अत्याचारावर घसा फोडून बोंब मारणारे आता कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित करीत वाघ यांनी संतापही व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button