breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरेगाव-भीमामध्ये संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंकडून वातावरणनिर्मिती- शरद पवार

मुंबई | महाईन्यूज

एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासावरून सध्या सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच, कोरेगाव-भीमामध्ये ज्यावेळी घटना घडली होती त्यावेळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी त्या भागात वेगळं वातावरण तयार केले होते, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

शरद पवार म्हणाले, “कोरेगाव-भीमामध्ये जी घटना घडली. त्यावेळेस आजू-बाजूच्या खेड्यांमध्ये अशी एक तक्रार आली की, संभाजी भिडे आणि एकबोटेंनी त्या भागात वेगळं वातावरण तयार केले. संभाजी महाराजांची जी समाधी होती. या समाधीचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीची जी समाधी होती. ती उद्ध्वस्त केली. वेगळं वातावरण तयार करण्यासंबंधीची मोहीमच घेतली. त्याचा परिणाम संघर्ष कधीही ज्या ठिकाणी पाहिला नाही, त्या ठिकाणी काही प्रमाणात हा संघर्ष झाला.”याचबरोबर, कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद ही दोन्ही प्रकरणे वेगळी असल्याचे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमाशी संबंध जोडण्यात आला. त्या परिषदेला हजर नसलेल्या लोकांना या प्रकरणात अडकवण्यात आले. त्यांच्यावर खटले भरून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. यात काही पोलिसांचाही हात होता. काही सरकारी अधिकारीदेखील यात सहभागी होते, त्यांच्याबद्दल आमची तक्रार आहे. त्यामुळे एल्गार प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असा आमचा आग्रह आहे. तशी चौकशी झाल्यास सत्तेचा गैरवापर करणारे उघडे पडतील,’ असे शरद पवार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button