उद्धवसाहेब माफ करा, यावेळी मत भाजपाला नव्हे तर मनसेला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/download-1-2.jpg)
मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली आहे. मात्र या युतीमुळे काही ठिकाणी शिवसैनिक नाराज असल्याचं दिसून येत आहे. शहरातील घाटकोपर पश्चिम येथे स्थानिक शिवसैनिकांनी युतीचे उमेदवार राम कदम यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. घाटकोपरमध्ये शिवसेनेचा उमेदवार द्यावा अशी मागणी शिवसैनिकांची होती. मात्र युती झाल्याने हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यात आला त्यानंतर या मतदारसंघात राम कदम यांना पक्षाने पुन्हा संधी दिली.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नसल्याने आम्ही राम कदम यांना मतदान करणार नसून आमचं मत मनसेला देणार असल्याचे पोस्टर्स लावण्यात आलेत. घाटकोपर पश्चिम भागात हे पोस्टर्स झळकले पाहायला मिळत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना खुल पत्र लिहिलं आहे. यामध्ये आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला असं नमूद करण्यात आलं आहे.