breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘निवडणुकीच्या प्रचारात मुळ मुद्दे भरकटवले जात आहेत’; डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी : २०२४ च्या निवडणूक प्रचारात मुळ मुद्दे भरकटवले जात आहेत. गद्दारी विरुद्ध एकनिष्ठा या विरोधातली लढाई, सोबतच मोदी विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी ही निवडणूक असल्याचं प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज भोसरी मतदार संघातील रुपीनगर, तळवडे, त्रिवेणीनगर, कृष्णानगर या भागातील दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, आशाताई भालेकर, दादा नरळे, नितीन बोडे, इम्रान शेख, अशोक पवार आदी सहभागी होते.

हेही वाचा – ‘कारखान्याच्या सभेचं भाषण असल्यासारखं…’; रोहित पवारांची घणाघाती टीका

नागरिकांशी संवाद साधताना डॉ. कोल्हे म्हणाले कि, संविधान वाचविण्यासाठीची ही मोठी लढाई या लोकसभेच्या माध्यमातून आपण लढत आहोत. पण

मी, माझं, माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन देश आणि देशातील जनता यांच्या प्रति माझी बांधिलकी आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणाची पहिली असली काय किंवा शेवटची असली काय त्याने महागाई कमी होणार आहे का? असा सवाल ही डॉ. कोल्हे यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button