breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

मुंबईसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘रेड अलर्ट’ जारी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडत आहे. आज मुंबईसह चार जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने मुंबईसह, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आज ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तांसात या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. रायगड जिल्ह्याला उद्याही रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

हेही वाचा – पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोला विरोध

कमी दाबाचा पट्टा निर्माण तयार झाला आहे त्यामुळे राज्यात मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने त्या ठिकाणीही पावसाचा जोर असणार आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपुर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसराला ‘रेड अलर्ट’ दिला आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई शहरासह उपनगरातील शाळांना सुट्टी

मुंबई शहर व उपनगरात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे गुरुवार २७ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button