Indrayani River : आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली!
पिंपरी : वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या आळंदीत इंद्रायणी नदी पुन्हा एकदा जलप्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. इंद्रायनी पुन्हा फेसळल्यानंतर थेट राज्य सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला जात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये इंद्रायणी नदीमध्ये वारंवार रसयानुक्त फेस येत असल्याचं दिसून येत आहेत. यासंबंधी प्रशासन देखील गंभीर नसल्याचे चित्र अधोरेखित होत आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी पाच मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. त्यावेळी महाराष्ट्र नियंत्रण मंडळाने यावर खुलासा केला. आम्ही सहा कंपन्या बंद केल्याचं, पिंपरी-चिंचवड पालिकेला एसटीपी प्लांट अत्याधुनिक करण्याचं आणि अवैधरित्या चालणाऱ्या गोडाऊनवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं. राज्य सरकारने सुद्धा या खुलाशावर डोळे झाकून विश्वास ठेवला. मात्र, आज पुन्हा एकदा इंद्रायणी फेसाळली आहे.
हेही वाचा – करोनानंतर मी काय मेलो का? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
इंद्रायणी नदीतील प्रदूषणामुळे वारकरी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारकऱ्यांच्या आणि आळंदीकरांच्या आरोग्याशी खेळ-खेळला जातो की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर प्रशासन देखील ठोस पावलं उचलत नसल्याचं बघायला मिळत आहे. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी प्रशासनाने योग्य ते निर्णय घेणे गरजेचे आहेत.