समीर वानखेडेंना २८ जूनपर्यंत अटक नाही? मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई : आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी समीर वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना २८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच केंद्रीय अन्वे।ण विभागाच्या (सीबीआय) कृतीवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलेला दिलासा रद्द करण्याच्या मागणीसाठी सीबीआयकडून संशय निर्माण होत असल्याची टिप्पणीही न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंजपीठाने केली. तसेच वानखेडे यांच्या भ्रष्ठाचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची केस डायरी मागवली आहे.
हेही वाचा – IND vs WI : भारतीय कसोटी संघातून ‘या’ दिग्गज खेळाडूचा पत्ता कट
सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयाच याचिका केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी तपासात सहकार्य केले नाही तर भविष्यात वानखेडे यांना अटक करू, असे सीबीआयतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. मात्र, वानखेडे यांची अटक अनिवार्य आहे या निष्कर्षांप्रति पोहोचले आहे की नाही याचे थेट उत्तर सीबीआयकडून दिले न गेल्याने न्यायालयाने सीबीआयच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.