मराठा आरक्षणप्रश्नी दिल्लीत मोर्चा काढावा लागेल- संजय राऊत
![“Kolhapur's fort came to Kothrud, but it doesn't feel bad; But… ”, Sanjay Raut's warning to Chandrakant Patil!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Sanjay-Raut1.jpg)
नाशिक – “मराठा आरक्षण प्रश्नी काढण्यात येणारा मोर्चा हा दिल्लीत काढायला हवा. मराठा आरक्षणाबद्दल आम्ही हात जोडून विनंती केली आहे. मात्र आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते यांनी दिली. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीवरुन संजय राऊतांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे. त्यावर आता ते पुढील निर्णय घेतील,” असे राऊतांनी सांगितले.
“मराठा मोर्चा दिल्लीत काढायला हवा”
“मराठा आरक्षणाप्रश्नी जर मोर्चा निघणार असेल तर तो दिल्लीत काढायला हवा. महाराष्ट्रातल्या वातावरणात गढूळपणा आणू नये. एक मराठा लाख मराठा दिल्लीत दिसायला हवा,” असेही राऊतांनी ठणकावले.
पक्षसंघटनेचं काम चांगलं सुरु
आगामी काळात, कोणत्या दिशेने जायच आहे, त्यानुसार काम सुरू आहे संघटनेला गती मिळण्यासाठी हा दौरा आहे. उत्तर महाराष्ट्रच योगदान महत्वाचं आहे. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ता पुढे न्यायची असेल तर उत्तर महाराष्ट्र साथ गरजेची आहे. शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही. जबाबदारी म्हणून काम करावं, आमचे सर्व लोक चांगलं काम करतात.आता हळूहळू संघटनेच् काम चांगलं होतंय.पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही. जबाबदारी म्हणून काम करावं. आमचे सर्व लोक चांगलं काम करतात. आता हळूहळू संघटनेच् काम चांगलं होतंय, अनुभवी लोकांची समिती स्थापन करु असं संजय राऊत म्हणाले.