महागाईचा उच्चांक! वाटाणा २०० रुपये किलो; भाज्यांचे दर गगनाला भिडले
मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे जनता मेटाकुटीला आली असतानाच आता भाज्यांच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे. भाज्यांच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
मुंबईच्या बाजारात भाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. दुधी 80 रुपये किलो, कोबी 80 रुपये किलो, काकडी 60 रुपये किलो, गवार 160 रुपये किलो, पडवळ 100 रुपये किलो, आवळा 120 रुपये किलो, दोडका 100 रुपये किलो, फरसबी 120 रुपये किलो, गाजर 120 रुपये किलो, फ्लॉवर 120 रुपये किलो, वांग 120 रुपये किलो, कारले 80 रुपये किलोला मिळत आहे. तसेच शिमला मिरची 120 रुपये किलो, भेंडी 80 रुपये किलो, वाटाणा 200 रुपये किलो, काटेरी वांगी 120 रुपये किलो, बीट 60 रुपये किलो, टोमॅटो 80 रुपये किलो, पापडी 120 रुपये किलो, तोंडली 120 रुपये किलो, लाल भोपळा 60 रुपये किलो आणि शेवग्याची शेंग 120 रुपये किलो भावाने बाजारात विकली जात आहे. महागाईच्या या उसळलेल्या आगडोंबामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.