breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाना पाटोळे हे महत्त्वाची व्यक्ती त्यांनी गांभीर्याने घेऊ नये, संजय राऊत यांचा मोलाचा सल्ला.

मुंबई: काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लोणावळ्यात केलेले वक्तव्य चांगलेचे महागात पडले असून महाविकास आघाडीत या वक्तव्यावरून ठिणगी पडल्याने त्यांना माघार घ्यावी लागली आहे. लोणावाळ्यातील काॅंग्रेसच्या शिबिरात त्यांनी आपल्यावर हे सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून राजकीय धुरळा उडाला आणि शिवसेना व राष्ट्रवादीने नानांच्या वक्तव्याबद्दल नाराजी जाहीररित्या नोंदवली. त्यानंतर संजय राऊत यांनी नाना पाटोळे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री  यांच्याकडून  आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले हे महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी फार गांभीर्याने घेऊ नये, असा सल्ला संजय राऊत यांनी नाना पाटोळे यांना दिला.

संजय राऊत यांना नाना पटोलेंच्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला असं वाटत नाही. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन विधान केलं असं वाटत नाही. राजकारणात पाळत ठेवणं याचे खूप वेगवेळे संदर्भ असतात. मलाही सरकारची सुरक्षा आहे. त्यामुळे सरकारकडून सुरक्षेची माहिती घेतली जाते. आपण कुठे जातो? काय करतो? कुठे गेल्यामुळे धोका आहे? एखाद्या अतिविशिष्ट व्यक्तिला सुरक्षा दिल्यानंतर त्याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात. नाना पटोले हे अति महत्त्वाची व्यक्ती आहेत. आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नानांनी या विषयाचं फार गांभीर्याने घेऊ नये. आम्ही सुद्धा घेत नाही. अशी विधानं होत असतात. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. त्यांनी त्या पद्धतीने काम करावं, असा सल्ला राऊत यांनी दिला.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button