breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

तुकाराम महाराजांवरील ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींचं स्पष्टीकरण; म्हणाले..

पुणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान, धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी देहूत जाऊन संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांना पत्रकारांनी संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विचारलं. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, मी तेव्हा एक लेख वाचला होता. त्या लेखाच्या आधारे मी त्या भाषेत बोललो होतो. त्याआधीही मी महाराष्ट्रात आलो होतो. त्यामुळे मला संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती आहे. मी त्यांच्याविषयी जेवढं शक्य होतं तेवढं वाचलं आहे. मी असं कधीही कोणत्याही संताविषयी म्हटलेलं नाही.

तेव्हा बोलताना माझ्यावर स्थानिक भाषेचा प्रभाव होता. कुणी साखर म्हणतं, तर कुणी शुगर म्हणतं. त्यामुळे मी निश्चितपणे स्वीकारलं की, माझ्या बोलण्यामुळे वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांना मानणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्या. माझ्या बोलण्यात काही दोष असेल तर, तो मी स्वीकारला आणि सुधारणा केली, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

हेही वाचा  –  सचिन किंवा सेहवाग नव्हे तर ‘हा’ खेळाडू आहे गौतम गंभीरचा आवडता बॅटिंग पार्टनर; स्वत: केला खुलासा 

मी आचार्य परंपरेचा साधक आहे. असा व्यक्ती कोणत्याही संताचा विरोध करेल असं होणार नाही. तसेच असा विरोध करणारा संतांचा अनुयायी होऊच शकत नाही. मी भारत हिंदूराष्ट्र व्हावं हा संकल्प घेऊन निघालो आहे. त्यामुळे मी संत महात्म्यांची प्रशंसा करण्याऐवजी विरोध करत असेल, तर पाश्चिमात्य संस्कृतीचे संस्कार आमचा हा प्लॅनच गिळून टाकतील. म्हणूनच मी हात जोडून संपूर्ण वारकरी संप्रदायासमोर खेद व्यक्त केला होता, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

मी संत तुकाराम महाराजांच्या शीलेचं दर्शन घेतलं. त्यांनी आपले अभंग इंद्रायणी नदीत सोडून दिले होते. मात्र, संत तुकारामांच्या तपस्येमुळे ते अभंग नदीत बुडाले नाहीत. त्यांना पाण्याचा स्पर्शही झाला नाही आणि ते पाण्यावर तरंगले. ही संतांची परंपरा आहे. भारत अद्भूत देश आहे. या संतांचा आशीर्वाद कायम राहिला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न संपूर्ण भारतात यशस्वी होईल. तसेच भारत हिंदूराष्ट्र होईल, अशीच प्रार्थना मी केली आहे, असंही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button