breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब- मुख्यमंत्री
सध्या राज्यात जे टीमवर्क आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. आपण सगळेजण एकसंध कसे राहात आहोत हे पाहिलं जातं आहे. आपल्याकडे रुग्णांची वाढ होते आहे ही बाब चिंतेची आहे. करोना आपल्या मागे लागला आहे. मात्र करोनाच्या मागे आपण हात धुवून लागलो आहोत. घरी बसून सगळ्यांना कंटाळा आला आहे. पण सध्या आपल्याकडे काहीही इलाज नाही. घरात राहूनही आपली जनता तणावमुक्त कशी राहिल हे वृत्तवाहिन्यांनी पहावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला आहे.