#CoronaVirus: कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा आज उच्चांक, तब्बल 12,323 जणांना मिळाला डिस्चार्ज
मुंबई: राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक झाला आहे. पहिल्यांदाच तब्बल 12,323 रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण दोन लाख 99 हजार 356 रुग्ण बरे झालेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.37 टक्के एवढे आहे. राज्यात आज 7760 नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यात आज तीनशे रुग्णांचा मृत्यू सध्या राज्यातील मृत्यूदर 3. 52 टक्के एवढा झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 57 हजार 956 एवढी झालेली आहे. राज्यात नऊ लाख 44 हजार 442 व्यक्ती घरात विलगीकरण आत आहेत तर 43 हजार 906 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडलेले आहेत. गेल्या 24 तासांत 52 हजार 050 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 803 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 55 हजार 746 झाली आहे. यात 5 लाख 86 हजार 298 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 12 लाख 30 हजारहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ रिसर्च (ICMR) नुसार देशात आतापर्यंत 2 कोटी 8 लाख 64 हजार 750 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल 6 लाख 61 हजार 182 लोकांची चाचणी करण्यात आली होती.