breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

1 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र अनलॉकचा पाचवा टप्पा लागू होण्याची शक्यता

महाराष्ट्र अनलॉकचा चौथ्या टप्प्यातला कालावधी येत्या 30 सप्टेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र अनलॉकचा पाचवा टप्पा लागू होण्याची शक्यता आहे. त्यासोबत नवी मार्गदर्शक तत्त्वेही लागू होऊ शकतात. त्यासाठी आज 28 सप्टेंबर किंवा उद्या 29 सप्टेंबरला नविन नियमावलींची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हळू हळू लॉकडाऊन अनलॉक करत 1,2,3,4 अशा टप्प्याटप्प्याने हटवला जात आहे. अनलॉक 4 मध्ये राज्यातील पर्यायाने देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी अनेक उद्योग, व्यवसाय आणि विविध क्षेत्राला सवलती देण्यात आल्या होत्या. आता अनलॉक 5 मध्ये कोणत्या सवलती मिळतात याबाबत उत्सुकता आहे.

ऑक्टोबर महिना हा सबंध देशभरात विविध सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे सण, उत्सव साजरे करण्यासठी नागरिकांनी एकत्र यायचे का? आलेच तर किती नागिरकांना एकत्र यायला परवानगी असेल? याबाबत उत्सुकता आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी सण उत्सव सार्वजनिक ठिकाणी जाहीरपणे साजरे करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी वाढत आहे. परंतू, देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची वाढती संख्या विचारात घेता सरकार त्यास किती अनुमती देते याबाबत साशंकता आहे. मात्र, मर्यादित स्वरुपात सण उत्सव साजरे करण्यास परवानगी मिळेल की किंवा अजून काही नविन नियमांचा यात

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button