शेतकरी म्हणतात मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा – संजय राऊत
!["So you have no right to do politics in Maharashtra"; Sanjay Raut told BJP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/sanjay-1569252013.jpg)
मुंबई | महाईन्यूज
शिवसेनाप्रमुख उध्वव ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला आहे. अनेक ठिकाणाहून शेतक-यांना संकटूत बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री हावा, अशी मागणी महाराष्ट्रातील शेतक-यांची आहे, असं संजय राूत यांनी सांगितलं. आता कुठलाही नवा प्रस्ताव नाही, जे आधी ठरलंय तेच शिवसेनेचं म्हणणं आहे, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
निवडणुकीपूर्वीच सत्तेत समसमान वाटा यावर सहमती झाली होती. आता भाजपाला शिवसेना कोणताही नवा प्रस्ताव पाठवणार नाही. राष्ट्रपती राजवट जर महाराष्ट्रात लागू झाली तर हा अधर्माचा विजय असेल असाही टोला संजय राऊत यांनी लगावला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यात आलेले नाही. दरम्यान शिवसेनेने चर्चेची दारं बंद केली आहेत. त्यामुळे आम्हीही वेट अँड वॉचच्याच भूमिकेत आहोत असं भाजपाने जाहीर केलं आहे.