breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिवसेना आणि काँग्रेसकडून आवाज दडपण्याचा प्रयत्न ,फडणवीसांचा आरोप!
![# Covid-19: Maharashtra government fails to handle Corona situation- Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/devendra.jpg)
मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजपकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्यात आणीबाणीची परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप भाजपने केला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करत टीका केली आहे.
आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम आहे. आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि कॉंग्रेस एकत्र त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असे ट्विट फडणवीस यांनी केला आहे.