लॉकडाऊनला गांभीर्यानं घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-262.png)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्ये लॉकडाऊन करण्यात आली आहेत. परंतु जमावबंदी असूनही लोक रस्त्यावर आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक लोक लॉकडाऊनला अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. तर स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका, असा दम मुख्यमंत्र्यांनी भरला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केला. देशभरातील जनता कर्फ्यू हटल्यानंतर मुंबईकर रस्त्यावर उतरलेले दिसले. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मुंलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र, गर्दी कमी करण्यासाठी टोल नाक्यावरुन वाहनांना मुंबईच्या दिशेनं तात्काळ सोडण्यात आलं. असंच चित्र देशात अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी घरा बाहेर न पडण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं आहे. मात्र, याचं पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त करत नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत नाराजगिचं ट्वीटही केलं आहे…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Capture-43.png)
“अनेक लोक लॉकडाऊनला अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. कृपया करुन स्वत:ला वाचवा, तुमच्या कुटुंबाला वाचवा, आदेशांचं गांभीर्याने पालन करा. राज्य सरकारांना माझी सूचना आहे की त्यांनी नियम आणि कायदा पाळायला भाग पाडावं,” असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/1232.png)
त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही लोकांना लॉकडाऊनला गांभीर्यानं घेण्याचं आवाहन केलं आहे. तसं त्यांनी ट्वीटही केलं आहे…